शनिवार, ४ जुलै, २०२०

27 जून


         *२७ जुन १९६७*

*लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. सुरू.*

बँकेच्या चार भिंतींबाहेर राहून, ग्राहकास आपल्या खात्यावरील मनी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय एनी टाईम काढून देणारे संगणकीकृत यंत्र म्हणजे एटीएम (अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन). लोक या यंत्राला 'एनी टाईम मनी' यंत्र म्हणतात.ग्राहकाच्या बँक खात्याला हे एटीएम दूरध्वनीच्या तारांनी किंवा अन्य मार्गाने जोडलेले असते. ग्राहकाची ओळख पटविण्याकरिता, एटएम कार्ड देताना बँकेकडून ग्राहकाला एक सांकेतिक गुप्त क्रमांक दिला जातो. त्याला पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) म्हणतात. यंत्रात टाकलेले एटीएम कार्ड व संबंधित PIN जुळले तरच एटीएम यंत्र व्यवहार पूर्ण करते. सोपेपणा, व्यवहार्यता, विश्वसनीयता आणि अचूकता या आर्थिक व्यवहारांकरताच्या अत्यावश्यक बाबींची पूर्तता हे यंत्र करते.

एटीएम यंत्राद्वारे, बँक ग्राहकास खात्यावरील शिल्लक तपासणे, पैसे काढणे, पैसे भरणे करणे अशा गोष्टी करता येतात. ग्राहक आपला पिन केव्हाही बदलू शकतो. एटीएम यंत्र परदेशांत विविध नावांनी ओळखले जाते. जसे ऑटोमेटेड ट्रँझॅक्शन मशीन, ऑटोमेटेड बँकिंग मशीन, मनी मशीन, बँक मशीन, कॅश मशीन, कॅश पॉइंट, बँकोमॅट इत्यादी..

*इतिहास*

पहिले अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन इ.स. १९३९मध्ये न्यूयॉर्क शहरात सिटी बँक ऑफ न्यूयॉर्कने चालूकेले. ल्यूथर जॉर्ज सिम्जियन याने ही निर्मिती केली होती. परंतु, ग्राहकांच्या निराशाजनक प्रतिसादामुळे सहा महिन्यांत ते बंद करावे लागले.

यानंतर पुढील २५ वर्षे या क्षेत्रात कांहीच घडले नाही. थेट २७ जून १९६७ रोजी बर्क्लेज बँकेने एन्फील्ड गांवी एक इलेक्ट्रॉनिक अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन उभारले. द ला रू याने या यंत्राची बांधणी केली होती. जॉन शेफर्ड बंरन याची ही मूळ कल्पना होती. याच दरम्यान कांही अन्य अभियंत्यांनीही यासंदर्भात पेटंट्स घेतलेली होती. पीआयएन (PIN)ची कल्पना ब्रिटिश अभियंता जेम्स गुडफेलोची. जॉन शेफर्ड बंरन याला २००५ साली आॅर्डर आॅफ द ब्रिटिश एम्पायरचा सन्मान प्रदान करण्यात आला.

या आद्य यंत्रांत टोकन सारावे लागे. हे टोकन यंत्र ठेवून घेई, त्यामुळे त्याचा वापर फक्त एकदाच होई. दहा दहा पौंडांच्या नोटांची पूर्वगणित पाकिटे त्यातून बाहेर येत. हे यंत्र एकल प्रकारात वर्गीकृत करता येईल.

आंतरजालावर आधारित अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीनची सुरुवात सन १९६८ मध्ये डलास-टेक्सास येथे झाली. डोनाल्ड वेत्झ्टेल हा स्वयंचलित-सामान हाताळणी-यंत्रणा सांभाळणाऱ्या डॉक्युटेल नामे कंपनीचा एक विभाग प्रमुख होता. त्याने ही कल्पना विकसित केली, त्यामुळे डोनाल्ड वेत्झ्टेलला जालाधारित अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीनचा निर्माता समजले जाते. सन १९७३पासून इंग्लंडने आंतरजालाधारित एटीएमच्या वापरात आघाडी घेतली. लॉईड्स बँकेने आयबीएम २९८४ हे यंत्र कॅशपॉइंट या नांवाने वापरास काढले. कॅशपॉइंट हे आजच्या एटीएमशी साधर्म्य असणारे होते. आजही कॅशपॉइंट हा लॉईड्स ट्रस्टी सेव्हिंग्ज बँकॆचा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. सर्व कॅशपॉइंट हे ऑनलाईन होते, व खात्यावर व्यवहारांची लगेच नोंद होत असे.

आणखी दखल घ्यावी अशी मॉडेल्स म्हणजे आयबीएम 3624, व 473X, डाईबोल्ड 10XX, टीएबीएस 9000 श्रेणी, एनसीआर 5XXX वगैरे.

एटीएम बँकेच्या परिसरात असेल तर त्यास ऑनसाईट एटीएम म्हणतात. अशी यंत्रे अधिक कार्यक्षम असतात. ती बँकेची बरीच कार्ये करू शकतात व त्यामुळे अधिक खर्चिक असतात. अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन्स शॉपिंग सेंटर, मॉल्स, विमानतळ, किराणा दुकाने, पेट्रोल पंप, किंवा लोक एकत्र येतील अशा कोणत्याही ठिकाणी असू शकतात. अशा धनयंत्राना ऑफलाईन एटीएम्स म्हटले जाते. ही यंत्रे साधारणपणे फक्त नॊटा अदा करण्याचे काम करतात. या ऑफलाईन एटीएम्सची देखभाल करण्याचे काम अनेकदा खासगी कंपन्यांवर सॊपविलेले असते.

*वित्तीय महाजाल*

धनादेशाचा पाया कोअर बँकिंग यंत्रणेवर उभारलेला आहे. कोअर बँकिंग यंत्रणेत ग्राहकाच्या खात्याची खातेवही आता शाखास्तरावर नव्हे, तर केंद्रीय मुख्यसंगणकावर सांभाळून ठेवलेली असते. एटीएम्स ही त्या त्या बँकेच्या केंद्रीय महासंगणकाशी जोडलेली असतात. परिणामी, या बँकेच्या कोणत्याही शाखेत किंवा एटीएमवर आपल्या खात्याचा तपशील ग्राहकास उपलब्ध असतो. प्रत्येक बँकेला प्रत्येक शहरात एटीएम बसविणे भारतासारख्या खंडप्राय देशात अशक्य आहे. त्यामुळे सहकार्याच्या भावनेतून व व्यावसायिक दृष्टिकोनातून बँकांनी आपापली एटीएम्स एकमेकांस उपलब्ध करून देणे हे क्रमप्राप्त होते. पण त्याकरता प्रत्येक बँकांची नेटवर्क्स एकमेकांशी जोडली जायला हवीत. दोन वा अधिक बँकांचे जाळे जोडणारा दुवा म्हणजे स्विच. याच्या माध्यमातून एका बँकेच्या एटीएममधून दुसऱ्या बँकेतल्या आपल्या खात्यावर व्यवहार करणे शक्य होते. या व्यवहारात खातेदारास एटीएम वापराबद्दल काही शुल्क मोजावे लागते. हे शुल्क स्विच आणि एटीएमबँक ठरावीक प्रमाणात वाटून घेतात.
*========================*

26 जून


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*
             *26 जून*

*जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन’*

              युनो जनरल असेंब्लीने २६ जून हा दिवस ‘अंमली पदार्थ विरोधी दिन’ पाळायचा’ आणि जगभरात चालू असलेल्या अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापारावर नियंत्रण आणायचे आणि जागतिक सोसायटीचे उद्दिष्ट – संपूर्ण सोसायटी अमली पदार्थमुक्त करण्याचे – पूर्ण कसे होईल यासाठी प्रयत्न करायचा. सर्वप्रथम हा निर्णय १९८७ मध्ये युएनच्या समोर मांडला गेला जेणे करून बेकायदेशीर अमली पदार्थांचा वापर जी जगासमोरील सर्वांत मोठी समस्या होती त्याला वाचा फुटली.
२०१८ वर्षाचा विषय (थीम) होती…
‘‘प्रथम ऐका – मुलांना व तरुणांना निरोगी व ज्ञानी बनविण्यासाठी मदत करण्याची पहिली पायरी म्हणजे प्रथम त्यांचे ऐकून घ्या.’’
अमली पदार्थांचा वापर टाळण्यास मदत करण्याचे हे पहिले पाऊल असून ते विज्ञानावर आधारित आहे व त्यामुळे मुले व तरुणांचे आयुष्य बनविण्यास उपयोगी ठरणार आहे. त्यांचे कुटुंब आणि त्यांचा समाज हा आज सर्वांत गंभीर परिणामांचा सामना करतो आहे. तरुणांच्या आरोग्याच्या समस्यांबरोबरच त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत- जसे आर्थिक नुकसान, समाजविघातक वागणूक म्हणजे चोरी, हिंसा आणि गुन्हेगारी जो समाजाला लागलेला एक कलंक आहे. भारत सरकारने १९८८ मध्ये कायदा केला. मोठ्या शहरांमध्ये दारूच्या वापरासोबतच या अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बदलत चाललेली कौटुंबिक रचना आणि मित्रांचा वाढता दबाव ही काही कारणे याच्यामागे असावीत.
अमली पदार्थांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींमध्ये काही गोष्टी दिसून येतात..
१) शारीरिक आरोग्य – अंमली पदार्थं सोडल्यानंतर दिसून येणारी लक्षणे, वाढती झोप किंवा सुस्ती, कोकेनमुळे वाढणारी हृदयाच्या ठोक्यांची गती आणि अल्कोहोलमुळे हातांमध्ये आलेला कंप.
२) मानससास्त्रीय आणि मानसिक आरोग्य – नैराश्य, चिंता
– बदलणारे मूड (मनःस्थिती), झोपण्यातील अडथळे
– रोजच्या कामातील आवड कमी होणे
– गोंधळ/भ्रम/नशा सोडल्यामुळे होणारा त्रास
– कुठलीही औषधे जास्त दिवस घेतल्यामुळे पुढे त्यांची मात्रा वाढवावी लागते
– धोकादायक मनःस्थितीत राहण्याची इच्छा.
३) सामाजिक विषय – चोरी, गुन्हा, हिंसा, आतंकवाद, समाज विघातक वागणूक, पैशांची गैरवाजवी मागणी.
रस्त्यावर किंवा फुटपाथवर राहणारी बरीच मुले ज्यांना भीक मागून किंवा लहान मुलांनासुद्धा मजुरी करून रहावे लागते त्यांना अमली पदार्थांच्या मार्गाने गेल्यास आपले कष्ट कमी होतील किंवा दुष्टांच्या तावडीतून आपली सुटका होईल, असे वाटते. दिल्ली कमिशनकडे आलेल्या लहान मुलांच्या दयाअर्जाच्या केसेसमध्ये असे आढळून आले की जास्तीत जास्त केसेस या अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकलेल्या होत्या. फुटपाथवर राहणारी मुले बरेच वेळा स्वस्त अमली पदार्थ वापरतात जसे रबर ग्लू. याच्यामुळे त्यांना रोजच्या त्रासातून जसे लैंगिक, शारीरिक किंवा मानसिक छळातून मुक्ती मिळते.

मित्रमैत्रिणींचा दबाव, अभ्यासाचा ताण, दारूचे व्यसन किंवा आईवडलांना असलेली अमली पदार्थांची सवय, एकच पालक असणे, आई-वडलांचे संबंध तणावपूर्ण असणे, पालक-पाल्यामध्ये सुदृढ संबंध नसणे इत्यादी कारणांमुळे मुलं अमली पदार्थांच्या आहारी जातात आणि त्यातच बुडून राहतात.

रस्त्यावर मिळणारे नशीली पदार्थ हे सहज उपलब्ध असतात. तंबाखू आणि दारू हे शाळकरी मुलांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात जसे ४० ते ८०% वापरले जातात. तरुणांवर मित्रांचा दबाव असतो, किंवा त्यांना प्रयोग करून बघायचा असतो आणि त्यांना त्यांच्या मित्रांनी स्वीकारावं असं त्यांना वाटत असतं.

नवयुवक आणि अंमली पदार्थांचा नशा –
किशोरवयीन काळ या अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकण्याचा व त्यांचा बेकायदेशीर व्यापार करण्याचा काळ आहे. प्रोत्साहक वागणूकच त्यांना चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करते. शिवाय खालील काही कारणे आहेत… १. आत्मविश्‍वासाची कमी, २. मानसशास्त्रीय अडथळे, ३. प्रवृत्त करणारे घटक, ४. मित्रमैत्रिणींना नाही म्हणण्याचे किंवा विरोध करण्याचे कौशल्य नसणे, ५. अकाली लैंगिक सक्रीयता, ६. किशोरावस्थेत गर्भधारणा, ७. समाजविघातक वागणूक, ८. शिक्षणात अपयश, ९. सकारात्मक निरोगी वागणुकीबद्दलचे अज्ञान असणे, १०. दारु किंवा अमली पदार्थ वापरणे म्हणजे ‘शान’ची गोष्ट आहे. ११. एखाद्या गँग किंवा गटामध्ये सामील असणे.

बर्‍याच वेळा यामध्ये कुटुंबसुद्धा जबाबदार असते- जसे पालकांना दारु किंवा नशेची सवय असणे, नात्यातील दुरावा, मुलांबरोबर चांगला वेळ घालवण्याची सवय नसणे, दारू किंवा अमली पदार्थांच्या सेवनाबाबत नियम व त्यांच्या परिणामांबद्दल स्पष्ट कल्पना नसणे, कुटुंबातील भांडणाचा परिणाम, घरगुती हिंसा, नोकरी किंवा कामधंदा नसणे.

किशोरवयीन मुले या सवयीमध्ये अटकण्यास कारणीभूत शाळा आणि समाजही मुख्य भूमिका निभावताना दिसतात. शिक्षणात अपयश, शिक्षकांकडून चुकीचा सल्ला, चुकीचे उत्तेजन, शाळेशी असलेल्या जबाबदारीची जाणीव नसल्यामुळे नवतरुण वाहवत जाऊन ड्रग रॅकेटमध्ये अडकला जाऊ शकतो.
म्हणूनच घर, शाळा आणि समाजातर्फे दीर्घकालीन प्रयत्न होणे अत्यावश्यक आहेत.
* कुटुंबातर्फे करता येण्यासारखे बचावात्मक उपाय किंवा घटक….
१) घट्ट कौटुंबिक संबंध किंवा नाते प्रस्थापित करणे.
२) पालकांमध्ये असलेलं सामंजस्य
३) शिक्षणासाठी प्रेरणा देणे
४) विद्यार्थ्यांना ताणाशी सामना करण्याचे शिक्षण देणे
५) दारू आणि अमली पदार्थांच्या संयत वापराबद्दलचे ज्ञान तसेच अपेक्षांबद्दल पालकांनी स्पष्ट जाणीव मुलांना करून द्यायला हवी.
६) कौटुंबिक निर्णयात पाल्यांना सामील करा आणि त्यांच्यासोबत एखादी जबाबदारी वाटून घ्या.
७) कुटुंबातील सदस्य हे पोषक आणि सहकार्य करणारे असले पाहिजेत.
शाळासुद्धा तरुणांना गुंतवून ठेवून शाळेबद्दल त्यांच्या मनात एक घट्ट आणि सकारात्मक नाते निर्माण करू शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्याबद्दल प्रोत्साहित केले पाहिजे, त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी व चांगल्या वागणुकीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे, शैक्षणिक ध्येय मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे आणि त्यांच्यात नेतृत्व गुण आणि निर्णयक्षमता वाढीस लागेल यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात, त्यांना शाळेच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करावयास हवे व शाळांनी विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

समाजसुद्धा या अंमली पदार्थ विरोधी चळवळीचा एक भाग होऊ शकतो…. कसे? – तरुणांना सामाजिक कार्यामंध्ये गुंतवून किंवा सामावून घेतले पाहिजे, कायद्याची अमलबजावणी समजावून दिली पाहिजे, सगळे नियम-कायदे त्यांना समजावून सांगून ते त्यांचे पालन काटेकोरपणे करतात की नाही याकडे लक्ष द्यायला हवे, समाजातील अमली पदार्थांचे धोकादायक परिणाम मुलांना व पालकांना समजावण्यासाठी कार्यक्रम घ्यावेत आणि त्यांच्याविषयीचे धोके मुलांना व पालकांना समजावून सांगावे.
गोवा हे सुंदर राज्य आहे व पृथ्वीवरील स्वर्ग आहे. गोव्यातील किनारी भागांमध्ये अमली पदार्थांचा उपयोग वाढत्या प्रमाणात होत असून पर्यटनामुळे याचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. अमली पदार्थ उपलब्ध करून देणार्‍यांवर कायद्याचा बडगा उगारायला हवा. त्यांचा उपयोग करणार्‍यांनाच नेहमी पकडलं जातं व शिक्षा केली जाते आणि हे उपलब्ध करून देणारे दुसर्‍या गिर्‍हाईकांना पकडतात जे त्यांच्या उत्पादकांची विक्री बाजारात करीत राहतात

25 जून


💥🌹विज्ञान दिनविशेष🌹💥*
      *विल्यम हॉवर्ड स्टाइन*

*जैविक रसायनशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - २५ जुन १९११*

विल्यम हॉवर्ड स्टाइन (२५ जून, इ.स. १९११, न्यू यॉर्क शहर, अमेरिका - २ फेब्रुवारी, इ.स. १९८०, न्यू यॉर्क शहर, अमेरिका) हा एक अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या जैविक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला ख्रिश्चन बी. ॲन्फिन्सन व स्टॅनफर्ड मूर ह्यांच्यासोबत १९७२ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

न्यू यॉर्क शहरात जन्मलेला व हार्वर्ड व कोलंबिया विद्यापीठांमधून शिक्षण घेणारा स्टाइन न्यू योर्कच्या रॉकेफेलर विद्यापीठामध्ये संशोधक होता.

In 1958 he and Stanford Moore developed the first automated amino acid analyzer, which facilitated the determination of protein sequences. Stein remained at Rockefeller for his entire career, and held visiting professorships at Washington University at St. Louis, Haverford College, the University of Chicago and Harvard University.
*========================

24 जून

विज्ञान शिक्षक मित्र♻️*
========================
संकलन :-श्री सतिश दुवावार, चंद्रपूर
https://vidnyanmitr.blogspot.com/
------------------------------------------------
*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥
        
*कॅरोलिन शुमाकर*

*शुमेकर (लेवी ९) या धुमकेतुचे सहसंशोधन*

*जन्मदिन - २४ जुन १९२९*

कॅरोलिन शुमाकर ही एक अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आहे.
तिने शुमाकर लेवी ९ या धुमकेतुचे सहसंशोधन केले आहे. तिने सर्वात जास्त धुमकेतु शोधण्याचे रेकाॅर्डदेखील केले आहे.

१६ जुलै १९९४ रोजी शूमेकर लेव्ही-९ हा धूमकेतू गुरु ग्रहावर आदळला. या टकरीत या धुमकेतूचे अनेक तुकडे होऊन ते दूरवर पसरले. ही प्रक्रिया २२ जुलै १९९४ पर्यंत चालू होती. तो धूमकेतू गुरूऐवजी पृथ्वीवर आदळला असता तर काही क्षणातच पृथ्वीवरील सजीव सृष्टी नष्ट झाली असती. इतकी तीव्रता या धूमकेतूमध्ये होती.

हा धूमकेतू डेव्हिड लेव्ही आणि करोलीन व युजीन शुमेकर या खगोलशास्त्रज्ञांनी शोधला होता म्हणून या धूमकेतूचे नाव शुमेकर-लेव्ही असे पडले. २४ मार्च १९९३ च्या रात्री या धुमकेतूचा शोध लागला होता. हा त्यांचा ११ वा धूमकेतू होता पण ११ धूमकेतुंपैकी २ धूमकेतू असे होते की जे पृथ्वीला पुनः कधीच भेट देणार नव्हते (non-periodic orbit) आणि त्यामुळे हा धूमकेतू ९वा होता ज्याचा आवर्तनकाळ २०० वर्षांपेक्षा कमी होता आणि पुनः येऊ शकत होता; म्हणूनच या धूमकेतूचे नाव पडले “शूमेकर लेव्ही-९”.

खर तर हा धूमकेतू गुरूने १९६०-७० च्या आसपासच गिळंकृत केला असता. पण तेव्हा त्यांची धडक टळली होती. ७ जुलै १९९२ च्या दिवशी हा धूमकेतू गुरु ग्रहावरील ढगांपासून फ़क्त ४०००० किमी अंतरावरून गेला होता, जे अंतर गुरुचा एक उपग्रह मेटीसच्या त्रिज्येइतकी भरेल. मेटीस हा गुरूचा चंद्र आहे आणि तो गुरूच्या गुरुत्वाकर्षणात पुरता बांधला गेलाय. त्याचा आकारही अगदी ओबडधोबड आहे. जेव्हा हे धूमकेतू महाशय जसजसे गुरुच्या आणखी जवळ जाऊ लागले होते तेव्हाच हे निश्चित झाले होते की या दोघांची “गळाभेट” अगदी निश्चित आहे म्हणून…. शुमेकर लेव्ही-९ धूमकेतू गुरूच्या “रोश लिमिट” त्रिज्येच्या आत आला होता म्हणून गुरूने त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे धूमकेतूचे तुकडे केले होते. कोणत्याही ग्रहासाठी एक “रोश लिमिट” असते ज्याच्या आतमध्ये एखादी वस्तू आली तर ती वस्तू त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे खेचली जाते. पृथ्वी आणि चंद्रासाठी ही रोशची मर्यादा सुमारे ९५०० किमी इतकी आहे,म्हणजे समजा चंद्र हळूहळू पृथ्वीच्या जवळ येऊ लागला आणि त्याने पृथ्वीपासुनची ९५०० किमीची रोशची मर्यादा भंग केली तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राचेही धूमकेतूप्रमाणे तुकडे पडतील आणि चंद्र पृथ्वीच्या पोटात गडप होईल. म्हणूनच तर सावधगिरी बाळगत चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३,८४,००० किमी अंतरावरूनच प्रदक्षिणा मारतोय.

खगोलशास्त्रज्ञांना ही पर्वणीच होती ,कारण आजवर कोणत्याही खगोलशास्त्रज्ञाने दोन खगोलीय वस्तूंची धडक प्रत्यक्ष पाहिली नव्हती. जुलै १९९४ च्या सुमारास या दोघांची धडक होईल हे गणिताने जवळपास निश्चित केले होते. शूमेकर लेव्ही-९ ने गुरूच्या गुरुत्वाकर्षणात प्रवेश केल्याने त्याचे २१ तुकडे उडाले होते, ज्यांना शास्त्रज्ञांनी इंग्रजी आद्याक्षरांची ( A to W ) नावे दिली होती. त्यातील काही तुकड्यांचा आकार काहीशे मीटरपासून दोन किमीपर्यंत होता. म्हणजेच मूळ धूमकेतूच्या केंद्रकाचा अंदाज शास्त्राज्ञांना आला होता जे सुमारे ५ किमीच्या त्रिज्येचे होते जे १९९६ ला दिसलेल्या “ह्याकुताके” धूमकेच्याच आकाराचा होता.

१६ जुलै १९९४ ला धूमकेतूच्या पहिला तुकडा-A गुरूवर आदळला. जेव्हा हा तुकडा गुरूवर आदळला तेव्हा याचा वेग होता सुमारे ६० किमी प्रतिसेकंद इतका प्रचंड…… ही धडक इतकी जबरदस्त होती की यामुळे गुरुवर एक मोठा लाल रंगाचा ठिपका तयार झाला जो लहान दुर्बिणीतूनही स्पष्ट दिसला. याची त्रिज्या सुमारे ३००० किमी होती म्हणजे एका प्रुथ्वीएवढा ठिपका गुरूवर तयार झाला होता. पुढील ६ दिवस धूमकेतूचे सारे २१ तुकडे एकेक करून गुरूवर जाऊन आदळत होते. सर्वात मोठा तुकडा-G, १८ जुलै १९९४ ला धडकला होता. या तुकड्याने गुरूवर सुमारे १२००० किमीचा मोठा गडद ठिपका गुरूवर निर्माण केला होता. यातून मुक्त झालेली उर्जा सुमारे ६०००००० मेगाटन TNT (जगातील एकूण न्युक्लियर उर्जेच्या ६०० पट) इतकी प्रचंड होती. शेवटचा तुकडा W २२ जुलैला धडकेपर्यंत या तुकड्याच्या धडकेची दाहकता टिकून होती.
*========================*

23 जून


*💥🌹आजचा दिनविशेष🌹💥*

        💥जोनास साल्क💥*

*पोलिओवर प्रभावी लसीची निर्मिती*

*स्मृतिदिन - २३ जुन १९९५*    ।
जोनास साल्क (ऑक्टोबर २८, १९१४ - जून २३, १९९५) अमेरिकन वैद्यकीय संशोधक आणि वनस्पतिशास्त्रज्ञ होते. त्यांना पोलिओच्या पहिल्या सुरक्षित आणि प्रभावी लसीच्या विकासासाठी प्रसिद्ध मानले जाते.  जोनास यांचा जन्म न्यूयॉर्क शहरात झाला.  पालकांना औपचारिक शिक्षण मिळाले नाही, परंतु त्यांना त्यांच्या मुलांचे यशस्वीपण पाहायचे होते.  न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील वैद्यकीय शाळेत शिकत असताना, डॉक्टर बनण्याऐवजी वैद्यकीय संशोधनात करियर करण्याचा त्यांनी स्वत: साठी वेगळा रस्ता निवडला.

पोलिओच्या विषाणूंवर लस निर्माण करण्यात जोनास साल्क या अमेरिकन वैद्यकतज्ज्ञाला १९५३ साली यश आले.

पोलिओच्या विषाणूंवर लस निर्माण करण्यात जोनास साल्क या अमेरिकन वैद्यकतज्ज्ञाला १९५३ साली यश आले.

साल्कच्या संशोधनानंतर, सहा वर्षांतच या संशोधनातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. अल्बर्ट साबिन या पोलिश-अमेरिकन वैद्यकतज्ज्ञाच्या मते, ही लस तोंडावाटे देता आली तर ते अतिशय सुलभ ठरणार होते. त्याने आपल्या प्रयोगशाळेत विविध प्राण्यांच्या उतींवर पोलिओचे, विविध प्रकारचे विषाणू वाढवले आणि त्यांच्या चाचण्या घेतल्या. यापैकी जनुकीय बदल घडून आलेले तीन प्रकारचे विषाणू, शरीरात पोलिओच्या विषाणूंशी लढा देणारी प्रतिजने (अँटिजन) निर्माण करत असल्याचे अल्बर्ट साबिन याला दिसून आले. जिवंत विषाणूंपासून बनवलेल्या या लसीची त्याने स्वत:वर, स्वत:च्या कुटुंबीयांवर यशस्वी चाचणी घेतली. टोचून घेण्याच्या लसीपेक्षा काही बाबतीत अधिक परिणामकारक असणारी ही तोंडावाटे घेण्याची लस भारतासह जगात अनेक ठिकाणी आज पोलिओवरील प्रतिबंधक उपाय म्हणून वापरली जाते.

22 जून


               *२२ जून १९७८*

*प्लुटोचा उपग्रह चारोनचा शोध जेम्स ख्रिस्ती याने लावला*
 
शैरन, जिसे कैरन भी कहतें हैं, बौने ग्रह यम (प्लूटो) का सब से बड़ा उपग्रह है। इसकी खोज १९७८ में हुई थी। २०१५ में प्लूटो और शैरन का अध्ययन करने के लिए अमेरिकी सरकार द्वारा एक "न्यू होराएज़न्ज़" (हिंदी अर्थ: "नए क्षितिज") नाम का मनुष्य-रहित अंतरिक्ष यान भेजने की योजना है। शैरन गोलाकार है और उसका व्यास १,२०७ किमी है, जो प्लूटो के व्यास के आधे से थोड़ा अधिक है। उसकी सतह का कुल क्षेत्रफल लगभग ४५.८ लाख वर्ग किलोमीटर है। जहाँ प्लूटो की सतह पर नाइट्रोजन और मीथेन की जमी गुई बर्फ़ है वहाँ शैरन पर उसकी बजाए पानी की बर्फ़ है। प्लूटो पर एक पतला वायुमंडल है लेकिन शैरन के अध्ययन से संकेत मिला है के उसपर कोई वायुमंडल नहीं है और उसकी सतह के ऊपर सिर्फ़ खुले अंतरिक्ष का व्योम है। शैरन पर प्लूटो की तुलना में पत्थर कम हैं और बर्फ़ अधिक है।

*भीतरी बनावट*
खगोलशास्त्रियों में आपस में मतभेद है के शैरन के अन्दर बर्फ़ और पत्थर की अलग तहें हैं या पूरे उपग्रह में एक जैसा बर्फ़ और पत्थर का मिश्रण है। प्लूटो और शैरन का घनत्व देखकर अंदाजा लगाया जाता है के प्लूटो का ७०% द्रव्यमान पत्थर है जबकि शैरन का केवल ५०-५५% पत्थर है। इस से कुछ वैज्ञानिकों की सोच है के प्लूटो पर किसी अन्य वस्तु के ज़बरदस्त टकराव से उसका ऊपर का मलबा उड़कर एक उपग्रह के रूप में इकठ्ठा हो गया। इसलिए शैरन में प्लूटो की ऊपरी सतह की बर्फ़ अधिक है और प्लूटो के अन्दर के पत्थर कम। लेकिन इस विचार में एक शंका पैदा होती है - अगर वास्तव में ऐसा हुआ होता तो शैरन का और भी बड़ा प्रतिशत हिस्सा बर्फ़ का बना होना चाहिए और प्लूटो का और भी बड़ा प्रतिशत हिस्सा पत्थर का। इसलिए कुछ अन्य वैज्ञानिकों का मानना है के शैरन और प्लूटो शुरू से ही अलग वस्तुएँ थीं जो टकराई, लेकिन फिर अलग होकर एक-दुसरे की परिक्रमा करने लगी।

*उपग्रह या जुड़वाँ ग्रह*
प्लूटो और शैरन का मेल सौर मण्डल में अनोखा है। शैरन का व्यास (डायामीटर) प्लूटो के आधे से ज़्यादा है और उसका द्रव्यमान प्लूटो का ११.६% है - जो सौर मण्डल में किसी भी उपग्रह-ग्रह की जोड़ी में सबसे अधिक है। तुलना के लिए पृथ्वी के चन्द्रमा का व्यास पृथ्वी का लगभग एक-चौथाई और द्रव्यमान पृथ्वी का केवल १.२% है। इस कारण से प्लूटो और शैरन का मिला हुआ द्रव्यमान केन्द्र का बिंदु प्लूटो के अन्दर नहीं बल्कि इन दोनों के बीच के खुले व्योम में पड़ता है और प्लूटो और शैरन दोनों इस बिंदु की परिक्रमा करते हैं। अगर खगोलशास्त्र की परिभाषाएँ सख्ती से लगाई जाएँ तो ऐसी स्थिति में दो खगोलीय वस्तुओं को ग्रह-उपग्रह न कहकर जुड़वाँ ग्रह कहा जाता है। फिर भी आम तौर पर शैरन को प्लूटो का उपग्रह ही माना जाता है।

21 जून


              *21 जून*

      *आंतरराष्ट्रीय योग दिन*

       योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो.

योग या शब्दाची उत्पत्ती युज या संस्कृत शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संयोग किंवा आत्म्याचा चराचरात व्यापून उरलेल्या चेतनेशी संयोग. योग पद्धती जवळपास दहा हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आचरणात आणला जाते आहे. वैदिक संहितांनुसार तपस्वी, ऋषी यांच्या संदर्भात प्राचीन काळापासून योगाभ्यासाचे संदर्भ आढळतात.

सिंधू संस्कृतीत सुद्धा योगमुद्रा आणि समाधी स्थितीतील मूर्त्या आढळतात. हिंदू धर्मात साधू, संन्यासी आणि योगी सुरुवातीपासूनच योगमार्गाचे आचरण करत मात्र सामान्य लोकांचा याच्याशी फारसा संबंध नव्हता. अलीकडेच सामान्यांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जगण्यासाठी योगाभ्यासाचे महत्त्व वाढते आहे. कारण आजकालची तणावपूर्ण जीवनशैली ही सर्वसामान्यांची दिनचर्या बिघडवून टाकत आहे.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग.

योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर, मन आणि आत्मा हे शरीराचे तीन मुख्य घटक; यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते. दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. यातून चांगुलपणाची भावना निर्माण होते.

योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते. योगाभ्यासाचे हे फायदे लक्षात घेऊन २१ जून २०१५ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

याआधी डिसेंबर २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी ध्यान आणि योग गुरू श्री श्री रविशंकर आणि इतर योग गुरूंनी पुर्तगाली योग परिसंघाच्या प्रतिनिधी मंडळाचे समर्थन केले आणि संपूर्ण दुनियेत २१ जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी केली. यानंतर ‘योग: विश्व शांतीसाठी एक विज्ञान’ नावाचे संमेलन ४-५ डिसेंबर २०११ मध्ये भरविण्यात आले.

जगत गुरु अमृत सूर्यानंद यांच्या म्हणण्यानुसार, विश्व योग दिनाचा विचार त्यापूर्वी दहा वर्षांपासून डोक्यात होता. पण संपूर्ण भारतातून इतक्या मोठ्या संख्येने या विचाराचे समर्थन करणे हे प्रथमच होत होते.

त्या दिवशी श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखाली विश्व योग दिवस २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र आणि यूनेस्कोद्वारा घोषित करण्यासाठी स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. कित्येक मोठमोठे योगविद्येत पारंगत असलेले योगी याला उपस्थित होते.

या उपक्रमाचे सूतोवाच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील आपल्या भाषणात केले होते ज्यात त्यांनी म्हटले होते,

“योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचं प्रतीक आहे. मनुष्य आणि प्रकृती यांच्यात सामंजस्य आहे; योग हा विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोण प्रदान करणारा आहे.

योगाभ्यासाचा आग्रह हा फक्त व्यायामापुरता नाही तर स्वतःच्या आत एक एकात्मतेची भावना जागवण्यासाठी आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग हा चेतना बनून, आपल्या परिस्थितीतील बदलाशी जुळवून घ्यायला आपल्याला मदत करू शकतो. चला तर, एक आंतरराष्ट्रीय योग दिवस दत्तक घेण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करूयात.”

यानंतर २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित करण्यात आला. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रातील १७७ सभासदांद्वारे २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता मिळाली.

प्रधानमंत्री मोदी यांचा हा प्रस्ताव ९० दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आला. हा संयुक्त राष्ट्रातील सर्वात कमी काळात पारित झालेला ठराव ठरला. लोकांच्या स्वास्थ्य आणि कल्याणासाठी संपूर्ण विश्वातील लोकांसाठी एक पूर्णतावादी दृष्टिकोण उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आमसभेद्वारे ‘वैश्विक स्वास्थ्य आणि विदेशनीती’ अंतर्गत हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला.

या उपक्रमाला कित्येक वैश्विक नेत्यांनी सुद्धा समर्थन दिले. सगळ्यात आधी नेपाळचे प्रधानमंत्री सुशील कोइराला यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले. संयुक्त राज्य अमेरिकेसकट १७७ हून अधिक देशांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. “आजवर आलेल्या कोणत्याही संयुक्त महासभेच्या प्रस्तावातील सहप्रायोजकांपेक्षा यातील सहप्रायोजकांची संख्या सर्वाधिक होती. ११ डिसेंबर २०१४ ला १९३ सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेने बहुमताने ‘योग आंतरराष्ट्रीय दिवस’ २१ जूनला साजरा करण्याची परवानगी दिली.

भारतात २१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीच्या राजपथावर झाला ज्यात खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजपथावर जवळजवळ ३६००० लोकांबरोबर योगासने केली.

*२१ जून हाच योग दिवस का ?*

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्‍त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो.

याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते.

योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला.

 *आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा केला जातो.*

तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला.

*विश्व योग दिवसाची उद्दिष्टे:*

◆ योगाभ्यासाच्या अद्भुत आणि प्राकृतिक फायद्यांबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देणे.
◆ योगाच्या माध्यमातून लोकांना ध्यानधारणेची सवय लावणे.
◆ योगसाधनेच्या फायद्यांबद्दल संपूर्ण जगातील माणसांचे लक्ष वेधून घेऊन लोकांमधील दुर्धर आजारांचे प्रमाण कमी करणे.
◆आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आरोग्यासाठी एक दिवस काढून जनसमुदायाला एकमेकांच्या जवळ आणणे.
◆ संपूर्ण विश्वामध्ये वृद्धी, विकास आणि शांती याचा प्रसार करणे.
◆ लोकांमध्ये वैश्विक बंधुभाव जागवणे.
◆ योगाभ्यासद्वारे तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करणे.
◆ लोकांना शारीरिक आणि मानसिक आजाराबद्दल जागरूक करणे आणि योगाच्या माध्यमातून त्यावर उपाय शोधणे.
◆ मानसिक स्वास्थ्य जपून दीर्घकालीन स्वास्थ्य प्राप्त करणे.
◆ योगाभ्यासातून लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा अनुभव देणे.

औषधे ही केवळ असलेल्या रोगांना नष्ट करतात. त्यातही आयुर्वेद हाच रोगांना हळूहळू समूळ नष्ट करतो. मात्र इतर सर्व प्रकारच्या, आजार लवकर बरा व्हावा म्हणून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे एक ठिकाणचा आजार दाबला जाऊन शरीरात इतरत्र त्या औषधांचे दुष्परिणाम दिसू लागतात. ‘Prevention is better than cure’ असं कोणीतरी म्हणून ठेवलंय ते खरंच आहे.

म्हणूनच या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळायला हवे आणि ते मिळावे यासाठी आजचा हा योग दिवस.  आपणही या अभियानात सामील होऊयात… योग आचरणात आणूयात.
*========================
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र
======================
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲

21 जून


💥🌸दिनविशेष🌸💥*

        *योहानेस श्टार्क*

*एक नामांकीत नोबेल पुरस्कार मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ*

*स्मृतिदिन - २१ जुन १९५७*

योहानेस श्टार्क (एप्रिल १५, इ.स. १८७४ – जून २१, इ.स. १९५७) हे विसाव्या शतकातील एक नामांकीत नोबेल पुरस्कार मिळालेले भौतिक शास्त्रज्ञ होते.
त्यांचा जन्म शिकेनहॉफ, बव्हारीया, जर्मनी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शि़क्षण बेरुथ जिम्नेसियम मध्ये झाले. म्युनिख विद्यापीठातून त्यांनी भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि स्फटीकशास्त्र हे विषय घेउन पदवी मिळविली (१८९४ - १८९७). आयझॅक न्यूटनच्या एका भौतिकशास्त्रातिल विषयाला घेउन त्यानी डॉक्टरेट केले.
१९०० पर्यंत त्यांनी त्याच भौतिकशास्त्र संस्थेत वेगवेगळ्या पदावर काही काळ काम केले. त्यानंतर त्यांनी गॉटींजेन विद्यापीठात बिनपगारी शिक्षकाची नोकरी पत्करली.
१९०८ मध्ये श्टार्क यांना नामांकीत RWTH आखेन विद्यापीठात प्राध्यापक पदाची नोकरी लागली. १९२२ पर्यंत त्यांनी ग्रेफ्सवाल्ड विद्यापीठासह अनेक नामांकीत विद्यापीठांत काम आणि संशोधन केले. १९१९ मध्ये त्यांना कॅनल किरणातील डॉप्लर परिणाम आणि विद्युत क्षेत्रातील वर्णपटाचे विभाजन (ज्याला नंतर स्टार्क परिणाम असे नाव मिळाले) यावरील संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारीतोषिक मिळाले. १९३३ पासून ते १९३९ मध्ये त्यांची निवृत्ती होईपर्यंत त्याची निवड फिसिकालीश टेकनिश बुन्देसान्सस्टाल्ट आणि डॉइश फॉरशूंग्सगेमेंशाफ्ट या संस्थेमध्ये अध्यक्षपदी झाली.
श्टार्क यांनी त्यांच्या कार्यकालात ३०० हून अधिक विद्यूतशास्त्र आणि इतर संबंधित विषयावर लेख लिहीले. नोबेल पारीतोषीका व्यतिरीक्त त्यांना विएन्ना अकॅडमी ऑफ सायन्सेसचे बॉगर्टनर पारितोषिक (१९१०), गॉटींजेन विएन्ना अकॅडमी ऑफ सायन्सेसचे वालब्रूच पारितोषिक (१९१४), रोम अकॅडमीचे मॅट्यूसी पदक त्यांना मिळाले. त्यांनी लुईस उप्लर यांच्याशी लग्न केले. तिच्यापासून त्याना पाच मुले झाली.
विज्ञानविश्वात त्यांचा परिचय १९१३ मध्ये त्यांनी लावलेल्या श्टार्क परिणाम मुळे झाला.