*💥🌸आर्यभट्ट🌸💥*
आर्यभट्ट यांचे मुळ गाव बिहारमधील कुसुमनगर हे आहे ,त्यांनी प्राचीन ज्योतिष ग्रथांचे संशोधन केले आहे तसेच स्वतः अनुभव घेऊन आर्यभट्टीय या ग्रथांची रचना केली गणितशास्त्रात आणि ज्योतिषशस्त्रात हा ग्रंथ अतिशय महत्वाचा समजला जातो गीतिकापडातील श्लोकांची संख्या १३ आहे यामध्ये आकाशाचा विस्तार पृथ्वी ,चंद्र ,सूर्य ,आणि ग्रह यांची अंतरे मोजण्याची लहान मोठी मापे या तेरा श्लोकांत दिली आहे आर्यभट हे वेध घेण्यात प्रवीण होते पृथ्वी स्वतः भोवती फिरते , हे निछितपणे सांगणारे आर्यभट हे पहिलेच शास्त्र असावेत आज रूढ़ असलेले अनेक सिद्धांत त्यांनी इ.स. च्या पाचव्या शतकात सर्वप्रथम सांगितले होते त्यांच्या ग्रंथाचा प्रचार व प्रसार दक्षिण भारतात झाला १६-१७ शतका पर्यंत दक्षिण भारतात त्याचे अध्ययन आणि अध्यापन सुरु होते आजही दक्षिणेतल्या वैशनव पंथात आर्यभटाना फार मान आहे १९ एप्रिल १९७५ या दिवशी भारताने आपला पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला त्या उपग्रहला आर्यभटांचे नाव देऊन भारताने प्राचीन संशोधकाचा गौरव केलेला आहे
अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेस चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे, हे त्यांना माहीत होते. तसे त्यांनीनोंदवून ठेवले आहे. पहिला आर्यभट्ट याने सूत्रांचा उपयोग खगोलशास्र विषयक ग्रंथांत मोठ्या प्रमाणावर केला. अशा ग्रंथांत आकडेमोड द्यावी लागते परंतु मजकूर तर मुख्यत्वे काव्यमय व यमकात असतो. मग संख्या पद्यात बसवण्यासाठी त्या अक्षराने निर्दिष्ट करायच्या व ती अक्षरे वृत्तात बसवून श्लोकात लिहावयाची असा मार्ग आर्यभट्टाने अवलंबला. त्यामुळे अक्षरसंख्या कमी होते, शिवाय वृत्तबद्ध लिखाण होते. त्यावेळी लेखनाची साधने उपलब्ध नसल्याने त्या संख्या अशा प्रकारे लक्षात ठेवणेही सोपे जात असे आर्यभटाने ० अंशापासून ते ९० अंशापर्यंत ३/१११ अंशाच्या फरकाने सर्व कोन घेऊन त्यांचे ज्यार्ध कसे काढावेत हे सांगितलेले आहे. तसेच पृथ्वी स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे हे सांगणारा पहिला शास्रन होय. वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे. तसेच 'पाय' नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे सूर्यसिद्धान्तावर याने लिहिलेला एक टीका ग्रंथ 'सूर्य सिद्धान्त-प्रकाश ' या नावाने प्रसिद्ध आहे.
*आर्य ग्रथाचे भाग*
(१) गीतिका पाद, (२) गणितपाद,(३) कालक्रियापाद, (४) गोलपाद.
मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही असे दिसून येते. अंकगणित ,बीजगणित व भूमिति या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता. आज बीजगणितावरचा उपलब्ध जुना ग्रंथ विख्यात ज्योतिर्वेत्ता आर्यभट्ट याचा आहे. व वयाच्या तेविसाव्या वर्षीच त्याने बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला. म्हणून आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते.
💡 *संकलन:*💡
श्री.सतीश दुवावार,चंद्रपूर
⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛⌛
════════════════

